मराठी-ई-अर्टिकल या मराठी ब्लॉगवर आता आपणही व्यक्त होऊ शकता व्यक्त होण्यासाठी लेख, अग्रलेख, कविता, चारोळी ईत्यादींचा समावेश असेल.

Saturday, November 3, 2018

स्टॅच्यू ऑफ युनिटी

      नुकताच हाेऊन गेलेल्या भारताचे लाेहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त पंतप्रधान    श्री. नरेंद्र माेदी यांनी १८२ मिटर उंच असलेला भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण करुन, ताे त्यांनी देशाला समर्पित केला. त्या द्वारे आपण देशाला तसेच जगाला एकतेचा संदेश देऊ पाहताेय! खरं म्हणजे सरदार पटेल यांचे भारताच्या ऐतिहासिक संस्थानांचे स्वंतत्र भारतात विलनिकरण करुन घेण्यात फार माेठे याेगदान आहे. कदाचित! त्यामुळेचं आपण आज अखंड भारताचा नकाशा डाेळ्यांनी पाहु शकताे, नाहीतर कल्पणा करणेही अवघड हाेते!
   जगातील सर्वात उंच पुतळा भारतात ऊभारुन आपण आज एक नवा विक्रम केला! त्याला खर्च किती आला? उभारणीला किती कालावधी लागला? काेणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला? काेणत्या कंपणीला काम दिलं गेलं? काम करायला किती देशाच्या अभियंते हाेते? त्यामुळे स्थानिक रहीवाशांना राेजगार उपल्बध हाेईल!, पर्यटक येतील, वगैरे.. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या निश्चितपणे दैनिक वृत्तपत्रे, व इतर माध्यमातुन वाचायला, बघायला मिळाली असेलचं! कारण त्याची मार्केटींग अगदी उत्तमप्रकारे केली गेलेली आहे,(उदा. जनधन याेजने प्रमाणे!) यात तिळमात्र शंका नाही! म्हणुन या ठिकाणी त्याचा उल्लेख करणे उचित ठरणार नाही!
     महत्वाचा मुद्दा हा आहे, जगातील ज्या विकसीत देशांना आपण आज सरदार पटेलांचा १८२ मिटर उंचीचा भव्य पुतळा उभारुन उंचीत मागे टाकले! आणि पुतळा उभारणीत जगात नंबर एकवर जाऊन पाेहचलाे! परंतु या ठिकाणी आपल्याला एका गाेष्टीचा विसर पडलेला दिसताे, जगातील ज्या-ज्या देशाला आपण पुतळ्यांच्या उंचीत मागे टाकले, त्या सर्वच देशाच्या आर्थिक विकासाची (GDP) उंची भारता पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. म्हणजेच त्या देशांनी सर्व प्रथम संपुर्ण आर्थिक विकास केला, किंवा सर्वांगीन विकासाला महत्व दिले आणि नंतर उंच पुतळे उभारलेत, म्हणुनच ते आज जगातील प्रमुख विकसीत राष्ट्रे आहेत आणि महासत्ता आहेत.
     या ठिकाणी उंच पुताळे उभारण्यास मुळिच विराेध नाही, परंतु इथे आज देशाची खरी गरज काय आहे, हे समजणे महत्वाचे आहे. म्हणजेच देशातील जिवंत माणसांचे जिवंत असुनही 'मेलेले पुतळे' हाेऊ नये! हिच अपेक्षा.
                                                                                ✒ सतीश इंगळे.
 


                        Article By Satish Ingle.
                             
               www.marathiearticle.blogspot.com

No comments:

Post a Comment

गाजरांचा पाऊस!

  गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न...

Copyright Ⓒ 2022, Marathi e-Article All Rights Reserved.