मराठी-ई-अर्टिकल या मराठी ब्लॉगवर आता आपणही व्यक्त होऊ शकता व्यक्त होण्यासाठी लेख, अग्रलेख, कविता, चारोळी ईत्यादींचा समावेश असेल.

Tuesday, October 30, 2018

मित्राैं, पिछले ७० सालाें मैं?

  भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र माेदी सत्येत आल्यापासुन एकचं वाक्य जास्त बाेलताना दिसतात! "मित्राैं...पिछले सत्तर सालाें मैं...??" एव्हांना ते सभेत भाषनाची सुरवात करणे असाे, किंवा साेशल माध्यमांवर व्यक्त हाेणे असाे, पंतप्रधान नेहमीच सुरवात याच वाक्यापासुन करतात. यातुन ते नक्की मागील सत्तर वर्षातील काॅग्रेस पक्षाला हिशाेब मागतात.? कि, उपदेश देतात! हेच काही कळायला मार्ग नाही. मागील सत्तर वर्षात जर काहीच प्रगती झाली नसती, तर आज जाे काही भारत आपण बघताेयं किंवा अनुभवताेयं असा ताे असता का? किंवा जी काही प्रगती देेेशात झाली ती काय फक्त मागील पाच वर्षातचं झाली का? या प्रश्नांंच उत्तर ईयत्ता पाचवीतील विद्यार्थी सुद्धा देेेेतील! परंतु याचा अर्थ असा मुळीच हाेत नाही, कि मागील सत्तर वर्षात काॅग्रेस पक्षाने देशाला १००% सुजलाम्-सुफलाम्  केलयं! मात्र त्यांनी त्यासाठी प्रयत्न नक्कीचं केलेत हे  सुद्धा नाकारुन चालणार नाही. याचीही दखल या ठिकाणी घेणे अगत्याचे ठरेल. उदा. १९६६-६७ मध्ये पहिली हरीत क्रांतीला सुरुवात असाे, किंवा १४ मे १९७४ मधील पाेखरण येथील पहिली अणुचाचणी, जागतिक शीतयुद्धांत भारताची निर्णायक भुमिका, किंवा अलिकडील १९९१-९२ चे आर्थिक उदारीकरणाचे धाेरण असाे ईत्यादी. अनेक महत्वाची निर्णय हे मागील सत्तर वर्षातच घेण्यात आलेली आहेत म्हणुनचं आज आपण भारत महासत्ता हाेण्याचे प्रत्यक्ष स्वप्न रंगवु लागलाे. याची जर आपण आपल्या कलिग राष्ट्रांशी तुलना करुन पाहीली तर निच्छित आपल्या मागील सत्तर वर्षाची कल्पणा येईल यात शंका नाही.
   १९८४ साली अमेरिकेने भारताला सुपर संगणक देण्यास नकार दिला तेव्हां, तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीनी सुपर संगणक निर्मितीची याेजना आखुन १९९१  मध्ये अमेरिकाच्या नाकावर टिच्चुन "परम" नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिली सुपर संगणक बनवला, व भारतात माहिती तंत्रज्ञानाला सुरवात झाली, त्यालाच आपण आज आयटी-युग म्हणताे. याच आयटी-युगाला ऐकेकाळी म्हणजेच १९८४ दरम्यान सद्याच्या सत्तारुढ भाजप पक्षाने संगणकला प्रत्यक्ष रित्या जाहिर विराेध केला हाेता. आणि हे सर्व विसरुन भाजप पक्ष आज डिजिटल इंडियावर भाषने देतानी दिसून येतो , त्याच संगणकाच्या मांध्यमाद्वारे भाजप नेते साेशल मिडियावर (Facebook, WhatsApp, Twitter) वर पक्षाचा प्रचार करुन आपले ज्ञान पाझरवतांना दिसतात, आणि मागील सत्तर वर्षात काहीच झाले नसल्याचा खाेेटा आव आणतात. हे म्हणजे सर्व  हस्यासपद व आर्श्चायकारक म्हणावं लागेल!
    २०१४ साली अमाप/अगणित आश्वांसने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला, त्यातील एकही आश्वासन तडिपार नेल्याचे या मावळत्या पाच वर्षात दिसले नाही! फक्त "ढिगभर" याेजनांचा जाहीर ऐल्गार करुन, चालु-घडामोडीचा मुलांचा अभ्यास तेवढा वाढवून ठेवला! असो, तासा-तासाला "ठरावीक लाभार्थीच्या"  जाहिराती दाखवुन, व काहीप्रमाणात रस्ते बांधुन जणतेची पाेटं भरत नसतात! नाेटबंदी करुन जुन्या नाेटा किती  RBI कडे परत आल्या? व नविन किती छापल्या गेल्या? काळा पैसा किती परत आला? या सर्वांचा हिशाेब करता-करता सत्तारुढ सरकारची दमछाक झाली, त्यातच एक पंचवार्षीक संपत आली, यात मात्र भारतीय अर्थव्यवस्तेचा कणा माेडुन, अर्थव्यवस्था पार काेमात नेवुन ठेवलीय.
   आज माननीय. पंतप्रधान श्री नरेंद्र माेदी मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही! व त्याचा हिशाेब विचारतात, परंतु  पुढील वर्षी २०१९ मध्ये मागील पाच वर्षात (२०१४-१९) दिलेल्या आश्वासनांचा हिशाेब जर जनतेनी त्यांना विचारला तर माननीय. पंतप्रधान यांना आर्श्चाय वाटु नये म्हणजे  झालं.
 
                                        
          ✒ सतीश इंगळे.


_____________________________________________
                     
                    Article By Satish Ingle.  

                        

  

Saturday, October 27, 2018

वंशाचा दिवा!

     एक दिवस संध्याकाळची वेळ हाेती लगभग काहीच मिनिटांनी अंधारच हाेणार हाेता, मला काही पुस्तके बाजारातुन आणायची हाेती, दुकाणे बंद हाेतील म्हणुन जरा मी घाईतचं रुमच्या बाहेर पडलाे. साधारणं चालत शंभर ते दिडशे मीटर अंतरावर मी गेलाे असेल, तेवढयात माझ्या विराेधी दिशेने एक आजी तावातावानं येत आसल्याची दिसली, आजीचं वय अंदाजे ७० ते ७५ दरम्यान असावं! तिच्या डाेक्यावर एक कुरतडलेलं एक गाठाेड हाेत, आणि हातात एक पिशवी, तिच्या पायात चप्पलही नव्हती, तिचा ताे अवतार बघता मी चालतांनी थाेडं थबकलाे! तेवढ्यात तिच्या हातातील पिशवीचा बंद तुटुन ती खाली पडली, त्यातील पडलेले तिचे कपडे ती घाईघाईत भरत हाेती मी जवळ जाऊन म्हणालाे आजी मी मदत करु त्यावर तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही, ती स्व:तहाचं बडबडत हाेती "नवसाचा दिवा हाेता ना" अस काही तरी क्षणभर माझाही गाेंदळ ऊडाला! थाेडया वेळाने आजी बाेलली "देलं घराच्या बाहेर काढुन तिनं अ्न त्यानं...पण, ताे मह्या नवसाचा हाेताना त्याला लहानाचा माेठा केलाना...वंशाचा दिवा हाेताना" अशा प्रकारे ती बरचं काही बडबडत हाेती.
    आता माझ्या लक्षात आलं हाेतं, आजीला तिच्या एकुलत्या एक मुलाने स्व:तच्या आईलाचं घराच्या बाहेर केलल हाेत, वेगळं केल हाेत! मी आजीला थोडं दबक्या आवाजात विचारले, आजी तुम्हीं आता कुठं जाणार? त्यावर आजी रागात म्हणाली " जाईल म्हंसणात" आणि ती पुढे निघुन गेली.
     आपल्या भारत देशाला फार माेठी प्राचीन संस्कृती व परंपरा लाभलेली आहे वसुधैव कुटुम्बकम् यातच आपली सामाजिक, काैटंबिक मुळे घट्ट रुजलेली आहेत. वसुधैव कुटुम्बकम संदेश भारतीयांनी सर्व जगाला दिला, म्हणजेच सर्व विश्व एक परिवार आहे, एक कुटूूंब आहे. असा त्याचा सरळ साधा अर्थ हाेताे. परंतु आज त्याच भारतात कुटंब-परिवार विभक्त हाेतांनी दिसतात! रक्ताची नाती तुटतांनी दिसतात! खर म्हणजे हे आपल्या सर्वांच दुर्भाग्यच म्हणावं लागेल!
     शेवटी एवढचं सांगेन आयुष्य हे खुप सुंदर आहे क्षणभंगुर आहे फक्त ते जगण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्याच रक्तांच्या जिवंत माणसांची कुटुंबाला आज खरी गरज आहे.
                                                     
                                                           - सतीश इंगळे.
     **************************************
                                       Article By Satish Ingle. 


Friday, October 26, 2018

बुलेट ट्रेन किती महत्वाची?

     अलिकडेच भारताला स्वातंत्र हाेऊन ७१ वर्ष पुर्ण झालीत. या ७०-७१ वर्षात ब्रिटीशांनी उभारलेल्या एकुण रेल्वेच्या २५% ही आद्याप रेल्वेचे नवीन जाळे आपण उभारु शकलाे नाही! ही वास्तविकता आहे. आणि हिच भारताची शाेकांतिका पण अाहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
       आ णि आपण आज केवळ जगाशी तुलना करुन देशात 'बुलेट ट्रेन' चे दिवा स्वप्न बघत आहाेत! स्वप्न बघण्यात काहीच हरकत नाही परंतु त्या आधी देशात आहे त्याच रेल्वेची तुट भरुन काढली पाहिजे. देशात अनेक भागात रेल्वेची मागनी हाेत असुनही आपण ती पुर्ण करु शकलाे नाही, अलिकडेच अापण मुंबई ठिकाणी केवळ रेल्वे स्टेशनवर ब्रिज अरुंध असल्याने माणसे किडे-मुंग्या प्रमाने चेंगराचांगरी हाेऊन मरतात, हरयाणा मध्येही दसरयाच्या दिवशी ६०-६५ लाेकांना रेल्वे चिरडते या असल्या घटनेने जगात भारताची नाचंकी हाेते आणि आपण "मेरा देश बदल रहा हैं.. आगे बढ रहा हैं.." चे गाने गात फिरताेयं! महत्वाचा मुद्दा हा आहे भारतात आजही पायाभुत सुविधा उपलब्ध नाहीत आणि आजही स्वतंत्र भारतात अनेक लाेकांनी आयुष्यात कधी रेल्वेनी प्रवास केलेला नाही किबंहुना रेल्वेला आजुनही त्यांनी प्रत्यक्ष डाेळयांनी बघितलेली नाही. आणि आपण बुलेट ट्रेन च्या गप्पा मारताे.
     राहिला प्रंश्न मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा, महाराष्ट्रात बुलेट ट्रेन १२० कि.मी धावणार त्यासाठी राज्य सरकारला २७ हजार काेटी द्यावे लागणार आहे आणि गुजरात राज्यात बुलेट ट्रेन ३८८ कि.मी धावणार खर्च किती? २७ हजार कराेड म्हणजे महाराष्ट्रा ऐवढाचं कसं काय? हा कुठंला न्याय? यात केंद्र सरकार ५०% निधी देणार आहे आणि २५% महाराष्ट्र व २५% गुजरात. आपले राज्य सरकार अगाेदरचं कर्जात बुडालेलं, त्यात GST मुळे महसुलात कात्री लागलेली. महाराष्ट्रांची अर्थव्यवस्था सद्या सलाईन वर चालु असतानां आणखी वाढिव 'बुलेट ट्रेन' चा आहेर कशासाठी?  मुळात हा लेख लिहण्यामागचा मुख्य हेतु हा आहे की 'बुलेट ट्रेन' आपल्यासाठी किती महत्वाची? तुम्हीचं ठरवा.
                                                         - सतीश इंगळे.

**(कृपया आपल्या प्रतिक्रिया खालिल कमेंट बाॅक्स मध्ये अवश्य दया.)
         
******************************************
                    Article By Satish Ingle.
                                 

गाजरांचा पाऊस!

  गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न...

Copyright Ⓒ 2022, Marathi e-Article All Rights Reserved.